ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच   

नवी दिल्ली : भारताने ९ मे २०२५ ला ऑपशन सिंदूर अंतर्गत नऊ दहशदवादी तळ नष्ट केले. देशातूनच नाही तर जगभरातून ऑपशन सिंदूर यशस्वी झाल्याने भारताचे अभिनंदन करण्यात आले.भारत-पाकिस्तान शस्त्रविरामादरम्यान भारतीय हवाई दलाने एक मोठे विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे असे हवाई दलाने म्हंटले आहे. त्यांनी एक्सवरून यासंदर्भात पोस्ट केली आहे.
 
भारतीय हवाई दलाने केलेल्या पोस्टमध्ये म्हंटल्याप्रमाणे , “भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पार पाडले.”ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने याबाबत योग्यवेळी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच, खोटी आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहा”, असे आवाहन भारतीय हवाई दलाकडून करण्यात आले आहे.

Related Articles